breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आनंदाची बातमी: राज्यात लवकरच आठ हजार पदांची पोलीस भरती
अमरावती | महाईन्यूज
राज्यात अनेक महिन्यांपासून जी पोलीस भरती थांबलेली होती, ती भरती प्रक्रिया आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. जवळपास आठ हजार पोलीसांची भरती केली जाणार आहे. असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे. अमरावतीमधील दर्यापूर येथील एका कार्यक्रमानंतर गृहमंत्र्यांनी माध्यमांना ही माहिती दिलेली आहे.
राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे गृहमंत्री यांनी सांगितलेले आहे. याचबरोबर राज्य सरकार गृहखात्यामधील रिक्त पदं देखील लवकरच भरणार आहेत. त्यामुळे आता पोलीस होऊ इच्छिणाऱ्या तरूणांसाठी ही आनंदाची व समाधानकारक बातमी आहे.