breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आता मोदींनी काय कांदे उगवावेत का?: रामदेव बाबा

महाईन्यूज |

कांदा टंचाई निर्माण झाल्यामुळे कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. देशात सध्याची कांद्याची परिस्थिती पाहता सरकारवर लोकांचा संताप पाहायला मिळत आहे. तर याच मुद्यावरून आता रामदेवबाबांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘लोक मोदी यांना म्हणतात कांद्याचे भाव कमी करा. मोदी हे काय कांदे उगवणार आहेत का,’ असा उलट प्रश्न रामदेव बाबांनी संगमनेर येथील गीता महोत्सवामध्ये बोलताना केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचीही व्यासपीठावर यावेळी उपस्थिती लावली होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “काही मुलं अभ्यासावेळी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, काही लोक कामावेळी कामाकडे दुर्लक्ष करतात व मग म्हणतात बेरोजगारी वाढायला लागली आहे. देशात बेरोजगारी वाढतेय, महागाई वाढतेय, गरिबी वाढतेय, देशाची अर्थव्यवस्था डगमगली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button