अर्णब गोस्वामींविरोधात आरोपपत्र दाखल, आज होणार सुनावणी
रायगड – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात रायगड पोलिसांनी अलिबाग मुख्य न्यायदडांधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानुसार आज अलिबाग कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. रायगड पोलिसांनी गोस्वामी यांच्यासोबतच आणखी दोघांवर गंभीर आरोप केल आहेत. त्यांच्यावरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने आत्महत्या करताना सुसाईट नोट लिहिली होती. या नोटमध्ये त्यांनी अर्णब गोस्वामीसह दोघांची नावे नमूद करून आपल्या आत्महत्येस हे लोक कारणीभूत असल्याचं स्पष्ट म्हटलं होतं. त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यांना अटक केली होती. यानंतर गोस्वामी यांनी अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका दाखल केली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा चांगलाच तापला होता. त्यामुळेच या प्रकरणावर राज्याचंच नाही, तर देशाचं लक्ष लागून आहे. आता आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालय काय निर्णय सुनावते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.