breaking-newsमहाराष्ट्र
निकृष्ट फरसाण बनवणाऱ्या कंपनीत मनसेने केली तोडफोड

अंबरनाथ : अंबरनाथ येथील एमआयडीसीत निकृष्ट दर्जाचं फरसाण तयार करणाऱ्या कंपनीत मनसेने आज तोडफोड केली. एमआयडीसीतल्या जीआयपी धरण परिसरात एक शेड उभारुन तिथे फरसाण तयार केलं जात असल्याची बाब समोर आली होती.
या शेडमध्ये उंदीर, मांजर, सरडे, माशा यांचा अक्षरशः सुळसुळाट होता. शिवाय निकृष्ट साहित्य, गलिच्छ वातावरण, काम करणाऱ्या कामगारांचं अस्वच्छ राहणीमान यामुळे लोकांच्या जीवाशी खेळ सुरु होता. याबाबत स्थानिकांनी या कंपनीत जाऊन जाब विचारला असता मालकाने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे संतावलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी या कंपनीत जाऊन तोडफोड केली.