breaking-newsराष्ट्रिय
भारत-पाक दोस्ती व्हावी ही चीनची इच्छा
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये दोस्ती असावी अशी चीनची इच्छा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेली दुष्मनी कमी करण्याचा चीनने निश्चय केला आहे. चीन-भारत-पाकिस्तान अशी त्रिपक्षीय शिखर परिषद व्हावी असा चीनचा प्रयत्न आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात जवळीक निर्माण होईल.
भारत आणि पाकिस्तानला एससीओ (शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन) चे सदस्य बनवण्यामागे तो ही एके हेतू आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारी देश आहेत. त्यांच्यात दोस्ती असली पाहिजे. भारताने चीनबरोबर 10 वर्षांचा करार करावा. डोकलामसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये अशी चीनची इच्छा असल्याचे चिनी राजदूतांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करताना चीनने म्हटले आहे, की नरेंद्र मोदींमध्ये शी जिनपिंग यांची झलक दिसते.