हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; ‘या’ मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार?
नागपूर : यंदाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. राज्याची उपराजधानी, संत्रानगरी नागपुर येथे हे अधिवेशन होत आहे. त्यामुळे पुढेचे १० दिवस राज्याचं लक्ष नागपूरकडे असेल. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.
सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजण्याची शक्यता आहे ते पाहुयात..
- राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. अशात विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा मुद्दा गाजणार आहे.
हेही वाचा – ‘भाजपचे हिंदुत्व एक दिवस तुम्हा-आम्हाला वल्कले गुंडाळून फिरायला लावेल’; ठाकरे गटाचा टोला
2. मराठा आरक्षणासोबतच धनगर आणि आदिवासी आरक्षणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
3. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणं आवश्यक आहे.
4. ललित पाटील ड्रग्स प्रकरण अधिवेशनात गाजण्याची शक्यता.
5. आरोग्य यंत्रणेतील भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
6. यंदाच्या अधिवेशनात विविध विधेयकं मांडली जाणार आहेत. या अधिवेशनात ९ विधेयकं मांडली जाणार आहेत.