breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी होणार? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं वक्तव्य

जे महाराष्ट्रात होतंय ते खरं तर बरोबर नाहीये

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या अंतर्गत वादाचे आता वेगळे स्वरूप पाहायला मिळत आहे. काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या अतंर्गत वादावर काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेब थोरातांचा राजीनामा मंजूर होणे न होणे हा कमांडचा प्रश्न आहे. परंतु बाळासाहेब थोरात यांनी आज पर्यंत काँग्रेस मध्ये केलेल्या कामासाठी त्यांच्या पक्ष एकनिष्ठतेसाठी हे बरोबरी ठरणार नाही. जे महाराष्ट्रात होतंय ते खरं तर बरोबर नाहीये. काँग्रेस मध्ये अशा घटना घडण दुर्दुवी आहे. यावरती आम्ही परीक्षण करत आहोत, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलावंच असं वाटत का? असं प्रश्न विचारताच म्हणाले की, कुणा वाटत कुणाला वाटत नाही. हा अधिकार आपला नाहीये हा अधिकार हायकमांड कडे आहे. हाय कमांड सगळी माहिती घेत अस्तांतर आणि सगळी माहिती घेऊन पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील असं वडेट्टीवार म्हणाले.

आघाडी सरकार असताना सभागृहात अध्यक्ष नाना पाटोळेंनी उत्तम प्रकारे काम केलं. सशक्त अध्यक्ष नाना पटोले खुर्चीत होते. मजबूत अध्यक्ष म्हणुन महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता. परंतु अशा वेळेस राजीनामा दिल्याने जो प्रसंग घडला आणि सरकारला पाय उत्तर व्हावं लागलं आणि नवीन अध्यक्ष मिळाले नाहीत त्यामुळे सरकारला पाय उत्तर व्हावं लागल त्यावेळेस अशी भावना अनेकांनी होती की नाही नाना पटोले यांनी राजीनामा घ्यायला नको होता, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button