कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला 1 लाख रूपये देणार; मध्य प्रदेश सरकारची घोषणा
भोपाळ – कोरोना काळात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना आधार मिळणार आहे. कारण कोरोना काळात ज्या कुटुंबाने आपल्या घरातील सदस्य गमावला, अशा कुटुंबाला सरकारकडून 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.
मध्य प्रदेशात आतापर्यंत 7 हजार पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. त्या सर्वांच्या कुटुंबियांना मध्य प्रदेश सरकार 1 लाख रुपयांची मदत करणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गुरूवारी संध्याकाळी ही घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत 4 मोठ्या घोषणा केल्या. यात कोरोनामुळे आपला जीव गमावावा लागलेल्या रुग्णांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिलाय. तसेच ज्या घरातील कर्ता माणूस गेला त्या कुटुंबाला पेन्शनचीही घोषणा केली आहे.
ज्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांच्याबद्दल आम्हाला दुःख आहे. संकटाच्या काळात मदत म्हणून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपये देणार. तसेच ज्या कुटुंबातील कमावती व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय त्या कुटुंबांना दरमहा 2500 रुपयांची पेन्शन दिली जाणार, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.