breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण?, नेत्यांची धडधड वाढली

मुंबई : राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. यातच उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची मुदत जवळ आल्याने या वेळी बाहेरच्या राज्यातील नेत्याला, की पक्षसंघटना वाढविण्यासाठी राज्यातील नेतृत्वाला उमेदवारी मिळणार, याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे. याबाबत उशिराने निर्णय होत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जातो, असेही काहींचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या कोट्यातील जागेसाठी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या नावाची चर्चा असून, अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. यासाठी काँग्रेस नेते मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे यांचे नावही घेतले जात आहे. पण मुंबई आणि दिल्लीत काय घडेल ते सांगता येत नाही, अशी माहिती काँग्रेसच्या एका नेत्याने खासगीत दिली. राज्यातून आतापर्यंत राज्यसभेसाठी निवडून गेलेल्या काँग्रेस खासदारांनी पक्षसंघटना वाढीसाठी किती काम केले, हा संशोधनाचा विषय आहे. अलीकडे, राज्यसभेवर मराठवाड्यातील काँग्रेसच्या नेत्या रजनीताई पाटील या निवडून गेल्या आहेत. तथापि, राज्यातील राजकीय घडामोडी आणि पक्षसंघटनेच्या वाढीच्या कामासाठी त्यांचे योगदान नजरेस पडत नसल्याचे पक्षातील एका नेत्याचे म्हणणे आहे. शिवसेनेतर्फे संजय राऊत आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज भरले असून, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रफुल्ल पटेल सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपनेसुद्धा या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार अद्याप जाहीर केले नसून, आज, रविवारी ही नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button