breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१ जूननंतर लॉकडाऊन कसा असेल? राजेश टोपेंनी दिली माहिती

मुंबई – राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉककडाऊन पुकारण्यात आला आहे. सुरुवातीला १५ दिवसांचा असलेला हा लॉकडाऊन आता १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे १ जूननंतरही लॉकडाऊन वाढणार की शिथिलता येईल याबाबत सामान्यांमध्ये संभ्रमता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.  दिलेल्या वृत्तानुसार, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा आकडा कमी असेल त्या-त्या जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देणार असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

तसंच निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरीही ते एकाचवेळी शिथिल होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. टप्प्याटप्प्यानं नियमांमध्ये शिथिलता दिली जाईल, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊन संदर्भातले महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ”राज्यात कोरोनाचा कहर उच्चांक गाठत असल्यानं देशभरात भीतीचं वातावरण होतं. पण मी राज्याच्या हितासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की, कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केलं. त्यामुळे हे जे काही नियंत्रण आलेलं आहे, मात्र अजुन यश मिळालेलं नाही,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे १ जूननंतरच्या निर्बंधाबद्दल सूचक विधान केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button