breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

हवामान विभागाने दिले शुभ संकेत, दिवाळीत पावसाची धास्ती नको

मुंबई ।

मुंबईसह राज्याच्या अनेक भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ऐन दिवाळीत पाऊस पडण्याची भिती नागरिकांना सतावत आहे. मात्र हवामान विभागाने राज्यातील जनतेसाठी शुभ संकेत दिले आहेत. विदर्भाच्या अनेक भागातून मॉन्सून निघून गेला आहे.

मुंबईसह राज्याच्या अनेक भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ऐन दिवाळीत पाऊस पडण्याची भिती नागरिकांना सतावत आहे. मात्र हवामान विभागाने राज्यातील जनतेसाठी शुभ संकेत दिले आहेत. विदर्भाच्या अनेक भागातून मॉन्सून निघून गेला आहे. तसेच, पुढील 48 तासांत मॉन्सून देशातून निघून जाणार असल्याची माहिती पुण्याच्या हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

परतीच्या पावासाने राज्यातील अनेक भागात थैमान घातले आहे, सततच्या पावसामुळे पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी कोकण भाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गडगडाटासह पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात ढगाळ वातावरण रहाणार असून मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button