मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! हल्लेखोरांकडून गोळाबार, दोघांचा मृत्यू
Manipur Violence : मणिपूर राज्यात मैतई आणि कुकी समाजातील वादातून दंगली सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. हा हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही. कंगपोकपी जिल्ह्याच्या सीमेवर हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामळे राज्यात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
कुकी समाजाच्या हरोथेल या गावावर गुरूवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हल्लेखोरांनी हल्ला केला. प्रत्युत्तरात कुकी समाजाकडूनही गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन हल्लेखोरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दोघांच्या मृत्यूनंतर शहरात तणाव निर्माण झाला आहे. शेकडो लोक मृत्यूच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरली आहेत.
हेही वाचा – पुण्यात तरूणीला वाचवणाऱ्या तरूणांची जितेंद्र आव्हाड यांच्याकडे एक मागणी
https://twitter.com/The_tark_news/status/1674656960187371525
हिंसाचार सुरू असलेल्या ठिकाणी जात असताना दंगलखोरांनी लष्कराच्या तुकड्यांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात लष्कराकडूनही गोळीबार करण्यात आला. लष्कराने केलेल्या कारवाईमुळे परिस्थिती आटोक्यात आली असल्याचं, लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.