breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर…’; नारायण राणेंचा इशारा
महाविकासआघाडी सरकारने भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. या नेत्यांमध्ये नारायण राणे यांचा देखील समावेश आहे. यावरूनच नारायण राणे यांनी सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकारने माझ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. त्यामुळे जर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज सरकार जबाबदार असेल, असे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे.
नारायण राणे म्हणाले की, राज्य सरकारने माझी सुरक्षा काढून घेतली याबद्दल माझी कोणतीच तक्रार नाही. माझ्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. पण माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल. ते रत्नागिरीत बोलत होते.
राज्याकडून सुरक्षा कपात करण्यात आली असली तरी केंद्राकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला सुरक्षा पुरवली असल्याचेही ते म्हणाले.