‘अमित शाहांनी दिलेल्या शब्द पाळला नाही’; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजप आणि शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अमित शाहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, २०१९ साली अमित शाहांनी दिलेल्या शब्द पाळला असता, तर आता फोडाफोडीचे धंदे करावे लागले नसते, अशा आशयाची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तेव्हा अमित शाहांनी शब्द मोडला नसता तर आता भाजपा आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री प्रत्येक अडीच वर्षे राहिला असता.
हेही वाचा – ‘शरद पवार सैतान, काळ सूड उगवतोय’; सदाभाऊ खोत यांची खोचक टीका
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्तासंघर्ष घडवला जातोय का? असा सवाल केला असता ते म्हणाले की, नाहीतर, याचा दुसरा अर्थ काय आहे. आता त्यांच्याकडून (भाजप) फोडाफोडीचे जे धंदे सुरू आहेत. त्याबाबत मी काही गोष्टी एक-एक करत बोलत जाणार आहे. शिवसेना व भाजपाला प्रत्येक अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हे सूत्र त्यावेळी माझं आणि अमित शाहांचं ठरलं होतं की. हे मी याआधीही माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवाजी पार्कवर सांगितलं आहे.
आजही पोहरादेवीची शपथ घेऊन सांगते, २०१९ मध्ये अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री असंच ठरलं होतं. त्याप्रमाणे अमित शाह वागले असते तर कदाचित अडीच वर्षे भाजपाचा किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन गेला असता. पण आज भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना इतर पक्षाच्या नेत्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागत आहेत. भाजपाचे जुने, ज्येष्ठ नेते किंवा कार्यकर्ते ज्यांनी आयुष्यभर भाजपासाठी खस्ता खाल्या. त्या खस्ता खाल्लेल्या कार्यकर्त्याला आता बाहेरून येणाऱ्या नेत्यांचा पाहुणचार करावा लागत आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.