ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमरावतीत बाईकस्वारांना ट्रकची धडक; तिघांचा मृत्यू

अमरावती|  जिल्ह्यातील चांदूर बाजार ते परतवाडा मार्गावर कुरळपूर्णा फाट्याजवळ बाईक आणि ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी रात्री हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री शे. शागीर शे. हबीब (वय 40 वर्ष), शे. तनविर शे. सत्तार (वय 35 वर्ष) आणि अलकेश पप्पू सलामे (वय 22 वर्ष) हे तिघे दुचाकीने परतवाडा मार्गावरून आपल्या कुरळ पुर्णा येथील घरून चांदूरबाजारला येत होते. यावेळी वैभव केळकर यांच्या शेतानजीक परतवाडा वाय पॉईंटवर मागून येणार्‍या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात शे. सत्तार आणि अलकेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर शे. तनवीर गंभीर जखमी झाल्याने त्याला अमरावतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत होते, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे कळते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button