TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

 चार जणांचे बळी घेणारा वाघ जेरबंद

चंद्रपूर : उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रात आतापर्यंत चार जणांचे बळी घेणाऱ्या एसएएम – II या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. जिल्ह्यात वन्यजीव आणि मानव संघर्षात मोठी वाढ झाली आहे. दर एक-दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. ब्रम्हपुरी परिसरातील जंगलात वाघांच्या हल्ल्यात मनुष्यहानीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. गेल्या २८ जून, १६ ऑगस्ट, १७ ऑगस्ट व ४ नोव्हेंबर रोजी एसएएम- II या वाघाने चार जणांचे बळी घेतले. तेव्हापासून या वाघावर वनविभागाने लक्ष केंद्रित करण्यात आले.

‘कॅमेरा ट्रॅप’मध्ये टिपलेल्या छायाचित्रांनुसार चार जणांचे बळी घेणारा वाघ एसएएम-II  हाच असल्याचे निष्पन्न झाले होते. एसएएम- II वाघाचा ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील शेतशिवारात नियमीत वावर असल्याने व मानवी जीवितास धोका कायम असल्याने त्यास जेरबंद करण्याची कार्यवाही सुरु होती. मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी एसएएम- II वाघास ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक ११८ मध्ये सायंकाळच्या सुमारास डॉ.  रविकांत खोब्रागडे यांनी ‘डार्ट’ करुन  बेशुद्ध केले. यानंतर वनविभागाने वाघाला पिंजऱ्यात जेरबंद केले. यावेळी वन विभागाचे संपूर्ण पथक उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button