breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात पुढील ३-४ दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा

Weather Update | आता थंडी हळूहळू गायब होताना दिसत असून राज्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात वाढ होताना दिसणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील ३-४ दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील ३-४ दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आलाय. यावेळी शहर आणि उपनगरात प्रामुख्याने आकाश निरभ्र राहणार आहे.

हेही वाचा     –      ‘काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबहाद्दर आहेत’; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप 

सध्या मुंबईसह कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर या भागांमध्ये उन्हाळा जास्त तीव्र होताना दिसतोय. उन्हाच्या चटक्यामुळे दुपारच्या वेळी काम नसल्यास घराबाहेर न पडण्याचा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button