राज्यात पुढील ३-४ दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा
Weather Update | आता थंडी हळूहळू गायब होताना दिसत असून राज्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात वाढ होताना दिसणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील ३-४ दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील ३-४ दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आलाय. यावेळी शहर आणि उपनगरात प्रामुख्याने आकाश निरभ्र राहणार आहे.
हेही वाचा – ‘काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबहाद्दर आहेत’; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
सध्या मुंबईसह कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर या भागांमध्ये उन्हाळा जास्त तीव्र होताना दिसतोय. उन्हाच्या चटक्यामुळे दुपारच्या वेळी काम नसल्यास घराबाहेर न पडण्याचा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे.