महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगीवरुन राजकारण तापले
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महामानवांच्या अवमानप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत विशाल मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यावरुन सत्ताधारी विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे.
नियमानुसार मोर्चा काढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कायदा-सुव्यवस्थेचे पालन केले पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. देशात अद्याप लोकशाही आहे. आजुनतरी हुकुमशाही आलेली नाही. त्यामुळे मोर्चा काढण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकरणार नाही, असा संताप खासदार संजय राउत यांनी केला आहे.
दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे. मोर्चासाठी महाविकास आघाडीने रितसर परवानगी मागितली आहे. आंदोलन करण्यावर बंदी आली असेल, तर सरकारने तसे जाहीर करावे. हा मोर्चा महाराष्ट्रप्रेमींचा आहे. सत्ताधारी किंवा विरोधक असा मोर्चा नाही. महामानवांच्या अवमानप्रकरणी हा मोर्चा आहे.