breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशातील ७ राज्यांत ऑगस्टपर्यंत ७० टक्के प्रौढांना देणार पहिला डोस

नवी दिल्ली – भारतातील ७० टक्के प्रौढांच्या म्हणजेच १८ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आता स्पष्ट हाेताना दिसत आहे. २१ जूननंतर लसीकरणाची गती वाढल्याने ७ राज्ये अशी पुढे आलीत की तेथे ऑगस्टपर्यंत ७० टक्के प्रौढांना लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. यासाठी लसीकरणाची गती अशीच राहणे गरजेचे आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते देशात ९४ कोटी लोकसंख्या १८ वर्षांवरील लोकांची आहे. यात २७.८७ कोटी (२९.६५ टक्के) लोकांनी पहिला डोस घेतला आहे. राज्यांचे प्रमाण लक्षात घेतले तर गुजरातमध्ये सर्वाधिक ४३ टक्के प्रौढांना एक डोस मिळाला आहे.
त्यानंतर राजस्थान, दिल्ली, केरळ , हरियाणा आघाडीवर आहेत. २१ जूनपूर्वी केरळ आघाडीवर होते. आता चौथ्या स्थानावर तर उत्तर प्रदेश आणि बिहार सर्वात मागे आहेत.तज्ज्ञांच्या मते ७० टक्के लोकांना पहिला डोस दिल्यानंतर त्यांना पुढील तीन महिन्यांत दुसरा डोस दिला गेल्यास त्यांच्यात हर्ड इम्युनिटी दिसून येते. ७० टक्के लोकांना डोस मिळाल्यानंतर हर्ड इम्युनिटीचा स्तर मिळतो. हर्ड इम्युनिटी आल्यास संक्रमणाचा प्रसार थांबतो. डब्ल्यूएचओच्या मते हर्ड इम्युनिटी आल्यानंतर कोरोना संपण्यास सुरुवात होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button