मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोल नाक्यावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
मुंबई : मुंबईतील वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर भीषण अपघात झाला आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे, तर सहा लोक जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. हा अपघात रात्री १०.१५ वाजता झाल्याची माहिती मुंबई झोन ९ चे DCP कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली.
एका इनोव्हा गाडी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास वरळीहून वांद्र्याकडे जात होती. सी लिंकवर टोल प्लाझापासून १०० मीटर अंतरावर ही इनोव्हा गाडी मर्सिडीज गाडीला घासून गेली. त्यानंतर इनोव्हा चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि टोल प्लाझावरून लवकर जाण्यासाठी पुढे येऊन दोन तीन गाड्यांना धडक दिली.
हेही वाचा – दिवाळीत खासगी ट्रॅव्हलने जास्त भाडे आकारल्यास कुठे कराल तक्रार?
#WATCH | Maharashtra | Around 12 people injured after a speeding car collided with a total of 6 vehicles parked at the toll plaza in the Bandra direction. The speeding car was coming from Worli towards Bandra. 3 of the injured are in serious condition: Mumbai Police
(Warning:… pic.twitter.com/3ijVwEls71
— ANI (@ANI) November 9, 2023
अपघातानंतर घटनास्थळावरुन चालक पळून जाण्याच्या तयारीत होता. जखमी अवस्थेत तो फरार होत होता. परंतु त्याला पकडण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.