मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे शरद पवारांकडून स्वागत
मुंबई – भारत 15 ऑगस्ट 2022 ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. यानिमित्ताने आतापासून पुढील 75 आठवडे हा दिवस साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाची घोषणा केली होती. या निमित्ताने मोदींच्या हस्ते अहमदाबादमध्ये हा महोत्सव सुरु करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचा ;-अभ्यासाला लागा! नीट परीक्षेची तारीख जाहीर
देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 75 आठवडे हा कार्यक्रम होणार आहे. शरद पवारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.भारत सरकारने स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रम साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम संपूर्ण राष्ट्रामध्ये जन-उत्सव म्हणून साजरे करण्याच्या कल्पनेचे मी मनापासून स्वागत करतो, असे ट्विट शरद पवारांनी केले.
The Government of India has decided to mark the 75 years of Indian Independence with the 'Azadi Ka Amrut Mahotsav' event. I whole heartedly welcome this initiative and the idea of celebrating it as a Jan-Utsav across the Nation.#AzadiKaAmrutMahotsav #India @PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 12, 2021
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साबरमती आश्रमातून आझादी का अमृत महोत्सव या मोहिमेला प्रारंभ केला. 15 ऑगस्ट 2022 च्या 75 आठवड्यांपूर्वी आज 12 मार्च रोजी या कार्यक्रमाची सुरूवात होत आहे. आझादी का अमृत महोत्सव संबंधित सर्व कार्यक्रम भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केले जातील. आपल्या देशाच्या सन्मान आणि भव्य इतिहासाचे गौरव करणाऱ्या या उपक्रमात सहभागी असल्याने मला अत्यंत अभिमान वाटतो, असेही पवार म्हणाले.
All the programs related to 'Azadi Ka Amrut Mahotsav' will also be organized in all the states and union territories of India. I feel extremely proud to be a part of this activity which glorifies the dignity and grand history of our country.#AzadiKaAmrutMahotsav #India
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 12, 2021
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास देशातील महान स्वातंत्र्य सैनिकांचा संघर्ष, बलिदान आणि शहिदांची आठवण करून देतो. या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी प्रयत्न केले. स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचे कृतज्ञतेने स्मरण करून ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो, असे ट्विट करत त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.