breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘म्हणून पवार साहेबांचीच आठवण व्हायला लागली’; राष्ट्रवादीचा भाजपला टोला

पायाखालची जमीन सरकू लागली की सगळ्यांनाच पवार साहेब आठवतात

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २०१९ साली ७२ तासांच सरकार स्थापन केलं होतं. यावेळी झालेल्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं. शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सरकार स्थापन झालं होतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची विधानं ते करतील, वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

पायाखालची जमीन सरकू लागली की सगळ्यांनाच पवार साहेब आठवतात. देशातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणवणार्‍यांना पोटनिवडणुकीत समोर पराभव दिसू लागलाय म्हणून पवार साहेबांचीच आठवण व्हायला लागली आहे. पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनत नाहीत हे तुमच्या तथाकथित नेतृत्वाला माहीत आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button