शाळेची घंटा वाजली! आजपासून राज्यातील शाळा सुरु
पुणे : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आजपासून राज्यातील शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. म्हणजेच आजपासून राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आजपासून राज्यातील सरकारी शाळांमध्ये किलबिलाट ऐकू येणार आहे. सुट्टीनंतर शाळा सुरु होत असल्याने शाळेत विद्यार्थ्यांचे आनंदात स्वागत करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आले असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. शेतीचे ज्ञान आवश्यक असल्याने यापुढे शेती विषयक विषय शिकवण्यात येणार आहे. याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्स देण्यात येणार आहेत.
हेही वाचा – शासकीय कर्माचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार
तसेच विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा आणि महाराष्ट्रासह देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा. जगातील सर्वात तरुण देश म्हणून जगाला उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा असे केसरकर म्हणाले. या कामी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शासन विद्यार्थ्यांच्या सोबत असून जगाचे दूत म्हणून सेवा देण्यासाठी तयार व्हावे, असेही केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले.
विदर्भातील शाळांना ३० जूनपर्यंत सुट्टी
राज्यात अनेक ठिकाणी आजपासून (१५ जून) शाळा सुरू होत आहेत. आजपासून राज्यातील शाळा सुरु होणार असल्या तरी विदर्भातील शाळा आजपासून सुरु होणार नाहीत. विदर्भातील शाळा ३० जूनपासून होणार आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी याची माहिती दिली आहे. त्यामुळे विदर्भातील नवे शैक्षणिक वर्ष ३० जूनपासून सुरू होणार आहे.