‘नीलम गोऱ्हे शिवसेनेत आल्या, खा-खा खाल्लं आणि ताटही घेऊन गेल्या’; संजय राऊतांचा खोचक टोला
मुंबई : शिवसेना शिंदे गटातील नेत्या नीलम गोऱ्हे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना बळीचा बकरा केला असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी बकरा नव्हे तर वाघ आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत म्हणाले, पक्ष सोडून पळून गेल्यांनी माझ्याबद्दल बोलू नये, मी बकरा, शेळी पळपुटा नाही, मी पक्षाशी इमानदार आहे. तर माझं अख्ख आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गेलं. जी आता माझ्याबद्दल बोलताय, ते कधी आले पक्षात? असा सवाल संजय राऊतांनी केला.
हेही वाचा – NIA ची ISIS विरोधात मोठी कारवाई; महाराष्ट्रात ४३ ठिकाणी छापेमारी, १५ जण ताब्यात
नीलम गोऱ्हे पक्षात आले, खा-खा खालं आणि ताट घेऊन त्या निघून गेल्या, ताटपण ठेवलं नाही. ताट, वाटी, चमचा सगळं सोबत घेऊन पळून गेल्या. बाळासाहेबांनी आम्हाला वाघासारखं बनवलं असल्याचेही संजय राऊत म्हणाले.