breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पंतप्रधान मोदींच्या शेजारी सिंचन घोटाळा, इक्बाल मिर्ची उभा होता’; संजय राऊतांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काल एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ वर्षात एनडीए आठवली नव्हती. मित्र पक्ष आठवले नव्हते. आपले सरकारी आठवले नव्हते. पण आम्ही पाटण्याला जमलो. बंगळुरूत भेटलो. त्यानंतर मोदी आणि शाह यांना एनडीए आठवली. याबद्दल एनडीएतील सध्याच्या लोकांनी मोदींचा सत्कार केला पाहिजे. आम्ही इंडिया म्हणून एकत्र आलो आहोत. मोदींनीच काय व्होट फॉ इंडिया म्हटलं पाहिजे. मोदी म्हणतात, मी इंडिया. मोदी इज इंडिया. हा इंडियाचा अपमान नाही का? त्याचा अर्थ काय होतो?

हेही वाचा – लोणावळ्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस, ४८ तासांत ४३४ मिमी पावसांची नोंद

मोदी म्हणजे इंडिया नाही. भाजप म्हणजे इंडिया नाही. प्रत्येक भारतीय इंडिया आहे. संपूर्ण देश काल जमला. ते भ्रष्टाचाराचं संघटन होतं असं मोदी म्हणाले. अरे तुमच्या बाजूला ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा होता. पाठीमागे इक्बाल मिर्ची उभा होता. हे सगळे भ्रष्टाचारी बाजूला घेऊन आमच्यावर आरोप करताय? हे ढोंग बंद करा. तुमचं ढोंग सर्वांना कळतंय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

तुम्हाला आता एनडीएची आठवन झाली ना? आम्ही २६ लोकं आल्यावर तुमचं एनडीएचं कमळ फुलायला लागलं. आम्ही भारत म्हणून एकत्र आलो तेव्हा तुम्हाला इंडिया आठवली आहे. इंडिया जिंकणार, भारत जिंकणार आणि हुकूमशाहीचा पराभव होणार. हिंमत असेल तर भारताचा पराभव करून दाखवा. तुमच्याकडे जेलमध्ये जाता जाता खेचलेले लोक आले. अमित शाह जेलमध्ये जाऊन आले. आम्ही काय म्हटलं का? अजितदादा आणि हसन मुश्रीफ तुरूंगात जातच होते, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button