‘शिवसेना तुमच्या बापाची आहे का भो***?’; संजय राऊत यांची निवडणूक आयोगाला शिवीगाळ
शिवसेना निवडणूक आयोगाने निर्माण केली का?
मुंबई : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह केंद्रीय निवडणुक आयोगाने शिंदे गटाला दिलं. या निर्णयाचा ठाकरे गटाकडून वारंवार विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणुक आयोगावर अतिशय खालच्या शब्दात टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, संघर्ष करणं हा शिवसैनिक आहे. उपाशी राहुन घरची चटणी-भाकर खाऊन तुम्हाला आमदार-खासदार, मंत्री केलं आहे. शिवसैनिक इथेच आहेत. आणि तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते ५० खोके देवून पळून गेले आहेत. निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची आहे, तुमच्या बापाची आहे का भो***? ही शिवसेना निवडणूक आयोगाने निर्माण केली का?, असं राऊत म्हणाले.
शिवसेनेची ताकद कोणाच्या दावणीला लागणार नाही. प्रत्येक जण म्हणतोय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला परत महाविकास आघाडीचे राज्य आणायचं आहे. महाविकास आघाडीचं राज्य आणायचं आहे. त्यासाठी सांगलीचा वाटा पाहिजे. काही घटकेचे सरकार आहे. आधी १६ आमदार अपात्र ठरणार आहेत. हिमतीचा सागर तो कसा आटणार?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
वसंतदादा पाटील, नाना पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जेव्हा-जेव्हा मुंबईवर दिल्लीचे आक्रमण झाले, त्यावेळी ते शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले. काँग्रेसचे मोठे नेते शिवसेनेच्या पाठिशी होते. भाजपने पाठीत खंजीर खूपसले. हे भांडण आता ४० चोरांशी नाही, भाजपशी आहे, असंही संजय राऊत म्हणाले.