breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मनोज जरांगेंच्या उपोषणावरून संभाजीराजेंचं मोठं विधान; म्हणाले..

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आज पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळाला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना स्वत:च्या तब्येतीला जपण्याचा सल्ला दिला.

संभाजीराजे म्हणाले, मनोज पुन्हा एकदा उपोषण करतोय हे ऐकून मी धावपळ करत इथे आलो आहे. त्याची धडपड मला दिसतेय. समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून तो हा संघर्ष करतोय. त्याने मला सांगितलं आहे, समाजाला न्याय मिळावा एवढीच त्याची इच्छा आहे. म्हणून तो उपोषणाला बसला आहे.

हेही वाचा – पुण्यात आज ओला, उबर, स्विगी, झोमॅटोची सेवा बंद

मला कळत नाही, मी मनोजला उपोषण करण्यापासून कसं थांबवू. त्याने विचारलं दुसरा पर्याय काय, त्यावर मी म्हटलं माझ्याकडे याचं उत्तर नाही. मी मनोजला कसं सांगू, माझ्याकडे शब्दच नाहीत. एकीकडे त्याला सांगायचं की, मनोज हे बरोबर नाही, उपोषण नको करू. तो माझ्या शब्दापलिकडे जाणार नाही असं म्हणेल, परंतु, त्यानेही समाजाला एक शब्द दिला आहे. मनोज शब्दाचा पक्का आहे, असं संभाजीराजे म्हणाले.

मला एका गोष्टीची खूप भीती वाटतेय. त्यामुळे मी त्याला फक्त एवढंच म्हणेन की तब्येतीला जप. हे उपोषण तब्येतीसाठी खूप हानीकारक आहे. परंतु, तो मला म्हणेल, मला समाज दिसतो, माझा समाज माझ्या जीवनापेक्षा मोठा नाही. त्याने मला एकच सांगितलंय, तो पाणीसुद्धा पिणार नाही. त्यामुळे मला त्याची खूप काळजी वाटतेय. मी उपोषण केलं होतं तेव्हा चार दिवस पाणी प्यायलो नाही. चार दिवसांनी पाणी प्यायलो तरी मी हतबल होतो. खूप त्रास होत होता. त्यामुळे मला मनोजची चिंता आहे. मला त्याची काळजी वाटते. म्हणूनच मी धडपडत, धावत-पळत कोल्हापूरहून इथे आलो. मी त्याला भेटायला कालच (२४ ऑक्टोबर) येणार होतो. परंतु, काल दसरा असल्यामुळे येऊ शकलो नाही, असंही संभाजी राजे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button