‘भूजबळांसह चार पाच लोक अजितदादांना व्हिलन बनवत आहेत’; रोहित पवारांचं विधान
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूड पडली आहे. राष्ट्रवादीत आता अजित पवार गट आणि शरद पवार गट अशे दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीत नेमकी फूट कोणामुळे पडली यावरून छगन भुजबळ आणि रोहित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, भाजपाने योग्य पद्धतीने डाव खेळला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मिता जपण्याकरता शिवसेना काढली आणि भाजपाने ती फोडली. अनेक नेते आपल्या कामात गुंतून राहावेत याकरता भाजपाने उद्धव ठाकरे यांची पार्टी फोडली आणि राष्ट्रवादी फोडली. त्यामुळे उत्तर प्रत्युत्तर आम्ही आमच्यातच देतोय आणि भाजपा राहतेय बाजूला.
हेही वाचा – प्रतीक्षा संपली! शाहरूख खानच्या जवानचा प्रीव्यू रिलीज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
नाशिकमध्ये भुजबळ बोलत असताना त्यांनी सहजपणे अजित पवारांना बाजूला काढलं. माझा अनुभव आणि वय कमी पडतं. पण तिथे सहजपणे पार्टी फुटायचं खापर अजित पावारांवर फोडलं गेलं. नाशिकमधील पोस्टरवर अजितदादांचा फोटोही नव्हता. म्हणजेच हे चार पाच नेते अजित दादांना व्हिलन करत आहेत. अजितदादा मोठे नेते आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय लोकांनाही पटला नाही आणि आम्हाला पटला नाही. सध्या सुरू असलेलं राजकारण भाजपा एसीत बसून बघून मजा घेतंय आणि आम्हाला आमच्यातच भांडतोय. कुटुंब कोणी फोडलं, पार्टी कोणी फोडली हे कोणी विसरणार नाही अशी भूमिका माझी आहे, असं रोहित पवार म्हणाले.
विकासासाठी तुम्हा निर्णय घेतला, मग तुमच्याकडे पद होतं तेव्हा विकास केला नाही का? असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे ही लढाई अस्तित्वाची आहे, अस्मितेची आहे, स्वाभिमानाची आहे आणि विचारांची आहे. जेव्हा या सर्व घडामोडी घडत होत्या तेव्हा माझ्या आई वडिलांनी प्रश्न केला की, जेव्हा आम्ही वयस्कर होऊ, आम्ही ८० च्या पुढे जाऊ तेव्हा तू सुद्धा अशी भूमिका घेशील का? माझ्याच आईवडिलांना असा प्रश्न पडले असेल तर सामान्य कुटुंबातील आई-वडिलांना हा प्रश्न पडला नसेल का? असंही रोहित पवार म्हणाले.