अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यादेवी नगर’, रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
मुंबई : अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रोहित पवार यांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे.
रोहित पवार म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याचे नाव हे अहिल्यानगर केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, आम्ही या गोष्टीचं स्वागत करतो. कोणताही जातीय धार्मिक व्यवहार न बाळगता सामान्यांच्या हितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी काम केलं आहे. त्यांचा जन्म चौंडी या ठिकाणी झाला आणि जिल्ह्याचे नाव हे त्यांच्या नावाने दिलं असेल तर त्याचे स्वागत आहे. पण त्याचं श्रेय कुठल्या एका व्यक्तीने किंवा एका पक्षांना घेऊ नये याच्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आहेत.
हेही वाचा – ‘देशाच्या मुलींना न्याय द्या’; राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
जो शासकीय कार्यक्रम झाला असं ते म्हणतात. तिथे सर्व नागरिक आले होते. त्यातले अनेक नागरिक हे कर्जत जामखेड नागरिक काही मान्यवर यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन जेवणाची भोजनाची जी व्यवस्था केली होती, असं रोहित पवार म्हणाले.