ताज्या घडामोडीमुंबई

तुरुंगात घरचं जेवण मिळावं यासाठी राणा दाम्पत्यांचा अर्ज

मुंबई |तुरुंगात घरचं जेवण मिळावं यासाठी राणा दाम्पत्यांनी अर्ज केला आहे. राणा दाम्पत्य राजद्रोहाच्या आरोपाखाली सध्या कोठडीत आहे. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात असणार आहेत. उद्या (शुक्रवारी) राणांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी कोठडीत घरचं जेवण मिळावं, अशी मागणी राणांनी अर्जाद्वारे केली आहे.

तुरुंगात घरचं जेवण मिळावं यासाठी राणा दाम्पत्यांचा अर्ज

राणा दाम्पत्याला वांद्रे कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. त्यामध्ये राज्य सरकारच्या वतीने अॅड. प्रदीप घरत बाजू मांडतील तर अॅड. रिझवान मर्चट राणा दाम्पत्याची बाजू मांडतील. आहे. तत्पूर्वी, राणा दाम्पत्याने घरचं जेवण मिळावं म्हणून अर्ज केला आहे.

राणांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली होती. त्यांनंतर राणा दाम्पत्याला रविवारी वांद्रे कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राणा दाम्पत्याविरोधात लावण्यात आलेला राजद्रोहाचा एफआयआर रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, मुंबई हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळली. राणा दाम्पत्याने यानंतर मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर मुंबई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, प्रक्षोभक वक्तव्य यासंदर्भात गुन्हे दाखल केले आहेत.

राणा दाम्पत्याची उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्याविरोधात तक्रार

राणा दाम्पत्याविरोधात खार पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा नोंद केल्यानंतर आक्रमक झालेल्या राणांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात तक्रार केली आहे. त्याचबरोबर परिवहन मंत्री अनिल परब आणि शेकडो शिवसैनिकांच्याविरोधातही राणांनी तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी शिवसैनिकांना चिथावल्याचा आरोप या तक्रारीतून राणांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button