उद्धव ठाकरेंवर टीका करताना रामदास कदमांची जीभ घसरली; म्हणाले..
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाची टीका केली. बाळासाहेब मर्दानचा नेता आणि उद्धव ठाकरे गांXचा नेता, असा घणाघात रामदास कदम यांनी केला.
रामदास कदम म्हणाले, मी मरेपर्यंत शिवसैनिकच असेल. मी मुबंईमध्ये कामाला सुरुवात केली. अनेक आंदोलनं केली. सुरुवातीला आंदोलनामुळे २ महिने एका केसमध्ये आत गेलो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना अशी घोष वाक्य होती. आम्ही सुरुवात केली तेव्हा उद्धव ठाकरे नव्हते. ते जुनिअर होते. त्यांच्या पेक्षा रामदास कदमला अनुभव नक्कीच जास्त आहे. मगाशी नीलम ताई हळूच चिमटा काढून गेल्या. कुणाला कळलं नसेल. मगाशी विषय निघाला. त्या पुरंदरच्या एअरपोर्टसाठी सगळ्यातआधी मी सुद्धा आंदोलन केलंय. कदाचित उद्धव ठाकरे यांनाही माहिती नसेल, खासदार संजय राऊत कधी आले मला माहिती नाही.
हेही वाचा – ‘शालेय पोषण आहारात अंडी वाटपाचा निर्णय मागे घ्या’; भाजपा अध्यात्मिक आघाडीची मागणी
शक्य असताना बाळासाहेबांनी कधीच कुठलं पद घेतलं नाही, त्यांचं हे येडं..उद्धव ठाकरेनी २००९च्या विधानसभा निवडणुकीत अनंत गिते यांना सांगून मला जाणूनबुजून पाडलं. जेव्हा बाळासाहेबांना कळलं तेव्हा मला विधानपरिषदेवर घेतलं. माझ्या ऑफिसमध्ये आदित्य ठाकरे येऊन बसायचा. मला पहिल्यांदा भारी वाटायचं. बाळासाहेबांचा नातू येऊन बसलाय, पण नंतर शासकीय मिटिंगमध्ये येऊन बसायचा. हे कायं ते कायं, ह्याला बोलवा त्याला बोलवा. आता वडील मुख्यमंत्री, मुलगा मंत्री आणि नेता तसाच. साहेब मर्दानचा नेता आणि उद्धव ठाकरे गांXचा नेता, असं रामदास कदम म्हणाले.
एखाद्याला कसं संपवायच हे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकावं. इतिहासात नालायक मुलगा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नावं राहिलं. उद्धव ठाकरे तू गद्दार..कुणी गद्दारी केली हे तुझ्या पिल्लूच्या डोक्यावर हात ठेऊन सांग तू गद्दारी केली नाही, ते पिल्लू आदित्य कुठं कुठं फिरतंय हे सगळ्यांसमोर लवकरच येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वडिलांसारखे असतील, पण बाळासाहेब लढलेना त्यांच्या विरोधात? ज्यांच्या विरोधात बाळासाहेब लढले त्या शरद पवारांसोबत हा उद्धव जाऊन बसलाय आणि सोनिया गांधीची आता हा चाटतोय..पाय म्हणतो मी..ऊगाच गैरसमज नको, असंही रामदास कदम म्हणाले.