breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

बारसू आंदोलन प्रकरणी राजू शेट्टी आक्रमक; म्हणाले,..

महाराष्ट्रातील शेतकरी तेथे जावून शेतकऱ्यांना वाचवतील

कोल्हापूर : बारसू रिफायनरीचा विरोध करत असलेल्या आंदोलकांवर काल लाठीमार करण्यात आला. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, बारसू रिफायनपीचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्रातील शेतकरी तेथे जावून शेतकऱ्यांना वाचवतील. यांच्याकडे किती पोलीस आहेत, किती लाठ्या आहेत आणि किती गोळ्या आहेत ते बघू. सरकारने आता शेतकऱ्यांशी दोन हात करण्याची तयारी दाखवावी. बारसूमध्ये पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध करतो.

बारसू सोलगाव रिफायनरी आंदोलनासाठी जाणारे स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांना आज राजापूर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत राजू शेट्टी म्हणाले की, पोलिसांच्या दडपशाहीला न घाबरता यापुढेही स्वाभिमानी आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी ठाम राहील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button