breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘सत्ता कशी हातात येत नाही, तेच बघतो…’; शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचं मोठं विधान

बारामती : लोकसभा निवडणूक संपताच शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. मागचे दोन दिवस शरद पवार बारामतीत आहेत. यावेळी ते शेतकरी मेळाव्यांना हजेरी लावत आहेत. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलंय. आज दोन्ही सरकारं आमच्या हातात नाहीत. पण कालच्या निवडणुकीत जसं काम झालं तसं काम केलं. तर राज्य सरकार कसं आपल्या हातात येत नाही, तेच मी बघतो. लोकसभेला जे योग्य होतं ते तुम्ही केलं. विधानसभेला सुद्धा जे योग्य आहे ते करा, असं आवाहन शरद पवारांनी केलंय.

शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील खांडज गावाला भेट दिली. शेतकरी मेळाव्यासाठी ते हजर होते. या गावातून अनेकांना मोठं करण्याचा प्रयत्न केला. सत्ता येते. सत्ता जाते सुध्दा… पण आलेली सत्ता लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठी वापरली तर लोकं आठवण ठेवतात, असं शरद पवार यांनी म्हटलं.

काही लोकं तात्पुरते यशस्वी होतात. मी नेहमी सांगतो, देशात लोकशाहीचं राज्य आहे. या निवडणुकीत वेगळं चित्र होतं. गावचे नेते कुठे होते कोणास ठाऊक? ज्यांना मोठं केलं ते आसपास दिसत नव्हते. मतमोजणी जेव्हा झाली. तेव्हा कळलं की गाव मोठ्या नेत्यांच्या हातात नाही. तुम्हाला निवडणुकीत माहिती होतं काय करायचं. आता आमची जबाबदारी आहे. तुमचं पाणी इतकं खराब आहे की त्यात हात पण नाही घालता येतं. हे पाणी कसं नीट करता येईल, असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button