करियर मार्गदर्शन मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा गुणवत्तापत्रक वितरण सोहळा उत्साहात

‘यशासाठी अथक परिश्रम करा’; प्रा.नितीन बानुगडे
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व पुणे शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि आयआयबी करिअर इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुणवत्ता संवर्धन अभियान २०२४-२०२५’ अंतर्गत आयोजित ‘मार्गदर्शन व गुणवत्तापत्रक वितरण सोहळा रविवार, दि. २० एप्रिल २०२५ रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे उत्साहात पार पडला. ‘इयत्ता १० वी नंतर पुढे काय?’ या विषयावर तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.
सुप्रसिद्ध वक्ते प्रा. नितीन बानुगडे -पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाला डॉ. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी, माध्य. पुणे जि. प.), सौ. छाया महेंद्रकर (उपशिक्षणाधिकारी, पुणे जि. प.), दशरथ पाटील (व्यवस्थापकीय संचालक, आयआयबी करियर इन्स्टिट्यूट),बालाजी वाकोडे-पाटील (संचालक, आयआयबी करियर इन्स्टिट्यूट, नांदेड), ॲड. महेश लोहारे (संचालक, आयआयबी करियर इन्स्टिट्यूट, पुणे), नंदकुमार सागर (सचिव, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, मुंबई), प्रसाद गायकवाड (प्रवक्ता, राज्य मुख्याध्यापक महामंडळ, मुंबई), शिवाजी शिंदे (अध्यक्ष, पुणे शहर मुख्याध्यापक संघ), शिवाजी कामथे (कार्याध्यक्ष), किशोर बोरसे (सचिव) ,दैविक मंठाळे (संचालक, आयआयबी करियर इन्स्टिट्यूट, शिवाजीनगर) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट, पुणे विभागाचे संचालक ॲड. महेश लोहारे यांनी केले.बालाजी वाकोडे-पाटील सरांनी आयआयबी करिअर इन्स्टिट्यूटच्या कार्यपद्धतीची ओळख करून देत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून करिअर निवडीचे मार्गदर्शन केले. पुणे शहरातील गुणवत्तापूर्वक कार्य करणाऱ्या ५१ शाळांना प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.आयआयबी करिअर इन्स्टिटयूटला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे २५०० विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर केली.गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे झालेल्या कार्यक्रमास जवळपास ३ हजारांवर विद्यार्थी आणि पालकांनी हजेरी लावली.आयआयबीचे संचालक ॲड. कल्पना लोहारे यांनी आभार मानले.
हेही वाचा – पिंपरी महापालिकेला १० लाखांचे पारितोषिक
जितके जास्त कष्ट , तितकेच मोठे यश :प्रा. नितीन बानुगडे
यशाचे रहस्य म्हणजे मागे हटणे नाही आणि अथक परिश्रम करणे आणि जर तुम्ही त्याचे पालन केले तर डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक बनण्याचा तुमचा दृढनिश्चय सार्थकी लागेल. “तुम्ही कोण आहात, यापेक्षा कोण होणार आहात, याचा विचार करा. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चांगले मार्गदर्शन घेण्यावर भर द्या. जितके जास्त कष्ट घ्याल, तितकेच मोठे यश मिळते. कुठलेही काम लहान, अवघड नसते. मनातून आपण खंबीर असलो की, सर्वकाही शक्य होते. मनापासून प्रयत्न कराल, तर नक्की यशस्वी व्हाल. मला डॉक्टर व्हायचे होते; पण योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. तुम्हाला मात्र आज ‘आयआयबी इन्स्टिटयूटसारखी ‘डॉक्टर, इंजिनिअर बनवणारी संस्था ’ मिळाली आहे. त्यामुळे तुमची जिद्द आणि त्यांची साथ एकत्रित झाली, तर देशाला चांगले डॉक्टर्स आणि इंजिनिअर्स मिळतील, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते, लेखक व इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले.
दुपारच्या सत्रात शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी शासनाच्या दृष्टीकोनातून गुणवत्तेची व्याख्या आणि शालेय व्यवस्थापनाचे महत्व स्पष्ट केले. राज्यस्तरीय संघटनेचे सचिव नंदकुमार सागर व प्रवक्ते प्रसाद गायकवाड यांनी मुख्याध्यापकांच्या योगदानाचे कौतुक करत पुढील योजनांची माहिती दिली.
मनातील गोंधळ दूर झाला :विद्यार्थी, पालकांचे मनोगत
“‘१० वी नंतर काय?’ या आयआयबी करिअर इन्स्टिटयूटने आयोजित केलेल्या उपक्रमात सहभागी होणे हे एक खूपच चांगले आणि माहितीपूर्ण अनुभव होता. या कार्यक्रमामुळे १० वी नंतर उपलब्ध असलेल्या विविध शिक्षण व करिअर पर्यायांची सखोल माहिती मिळाली,गोंधळ दूर झाला, योग्य दिशा मिळाली,अशा प्रतिक्रिया जितेंद्र मोहिते (पालक),दीपक काळे (विद्यार्थी),योगेश्वरी बोराटे (विद्यार्थिनी) यांनी व्यक्त केल्या.