ताज्या घडामोडीपुणे

मशिदींवरील भोंगे हटविण्यासाठी राज ठाकरेंच्या अल्टिमेटम; आता देशभरातील हिंदू बांधवांना केलं अवाहन

पुणे| देशात हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्यांवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत दोन मोठ्या घोषणा केल्या आहे. तसंच. मशिदीवरील भोंग्यावरुन पुन्हा एकदा इशारा देत देशवासियांना जाहीर आवाहन केलं आहे.

मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे. भोंग्यांचा त्रास फक्त हिंदूनाच होतो असं नाही, सर्वांनाच हा त्रास होतो. त्यामुळे जर ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर जशास तसे उत्तर देण्यास देशभरातील हिंदू बांधवांनी तयार राहावं. आम्हाला देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नको आहेत, त्यामुळे तुम्ही शांततेत भोंगे काढून घ्या अन्यथा आम्ही दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवणार, असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
आता रमजान सुरू आहे त्यामुळं मला कोणतीही गोष्ट करायची नाही. पण त्यांना ३ मेपर्यंत समजलं नाही. त्यांना या देशातील कायद्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयापेक्षा स्वतःचा धर्म मोठा वाटत असेल, लाउडस्पिकर वाटत असेल तर मला वाटतं जशास तसं उत्तर देणे देखील गरजेचं आहे, असं राज यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी आणखी एक घोषणा केली आहे. पाच जून रोजी सहकाऱ्यांसोबत राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button