‘इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही’; प्रकाश आंबेडकरांचं विधान चर्चेत
मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत माविआच्या बैठकीला उपस्थिती लावली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही, असं ते म्हणाले. महत्वाचं म्हणजे त्यांच्या बाजूला खासदार संजय राऊत उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मविआ आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये हे आमचं बैठकीत ठरलं आहे. आम्ही ही दक्षता घेऊ. त्यामुळे ताक जरी असलं, तरी फुंकून फुंकून प्यायचं असं मी ठरवलंय. जागावाटप हा आमचा पुढचा टप्प्याचा मुद्दा असेल. पहिल्या टप्प्यात किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा आम्ही घेतला आहे. त्यावर सध्या निम्मी चर्चा झाली असून निम्मी चर्चा बाकी आहे.
हेही वाचा – पुनम पांडेचा जीव घेतलेला Cervical cancer म्हणजे काय? काय आहेत लक्षणे?
इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही. अखिलेश यादव आणि काँग्रेस हे शेवटचे मित्रपक्ष राहिले होते. माझ्या माहितीप्रमाणे दोघेही वेगळे झाले आहेत. दोघे वेगळ्या मार्गाने चाललेत अशी माझी माहिती आहे. तसं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. पण सत्य परिस्थिती तशी आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.