‘..तर भाजपमुक्त प्रभू श्री राम करू’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
![Uddhav Thackeray said that Ram is not the property of any person or party](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Uddhav-Thackeray-780x470.jpg)
मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचं नाशिकमध्ये राज्यव्यापी महाधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. राम कुठल्याही व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. तशी मालकी केली तर भाजपमुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी अयोध्येला गेलो. अयोध्येला कधी येणार सांगत होते. आज मोदी अयोध्येला गेले. पण पूर्वी गेले नव्हते. पंतप्रधान होण्याआधी गेले असतील. फडणवीस म्हणतात तसे म्हणाले. मी शिवनेरीला गेलो. मी तिथली माती अयोध्येला गेलो. तुम्ही माना अथवा नको मानू. मी तिथे गेलो आणि थंड बस्त्यातील अचानक वर आला आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. हा त्या मातीचा महिमा आहे. ती माती जिल्ह्यात न्यायला सांगतो. कारण त्याचा महिमा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – ‘शिवसेना नसती तर अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती’; संजय राऊतांचं विधान चर्चेत
काही वेळेआधी संजय राऊतांनी या अधिवेशनात भाषण केलं. यावेळी त्यांनी ठाकरेंची प्रभूरामांशी तुलना केली. यावर ठाकरेंनी भाष्य केलं. आज रामायणातील बारकावे संजय राऊत यांनी सांगितले. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले होते. राऊतांनी सामनाचे श्लोक सांगितले. सामना कसा करावा याचे श्लोक सांगितले. संयम, एक वचनी आणि एक पत्नी ते खरच आहे. माझा उल्लेख केला. ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आज रामाचे मुखवटे घालून रावण फिरत आहेत. त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत. श्रीरामचंद्राचे अनुयायी म्हणून बरोबर आहे. रामाची तुलना केली नाही त्याबद्दल धन्यवाद, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
काल सर्व अंधभक्त तिकडे जमले होते. त्यांचं ज्ञान आणि बुद्धीचा आदर करतो. कुणी तरी एकाने मोदींची बरोबरी पंतप्रधानांची तुलना शिवाजी महाराजांशी केली. आजचे शिवाजी म्हणजे पंतप्रधान. अजिबात नाही. त्रिवार नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं. तुम्ही तिकडे बसला ते केवळ शिवाजी महाराजांमुळेच नाही तर ते ऐऱ्या गबाळ्याचं काम नव्हतं. ती माती आहे, त्यात ते तेज जन्माला आलंय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.