रामदास कदमांना भांडी घासण्याची कसली हौस? ठाकरे गटातील नेत्याचा टोला
![Sushma Andhare said that Ramdas Kadam has such a passion for washing dishes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Ramdas-Kadam-780x470.jpg)
मुंबई | शिवसेना शिंदे गटाचा कोल्हापूरात महाअधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ४० आमदारांपैकी एकाने जरी ५० खोके घेतल्याचं सिद्ध केलं तर मी उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन भांडी घासेने, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी झाली पाहिजे, असही ते म्हणाले. त्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, रामदास कदम यांच्यावर फार बोलून त्यांना महत्व देण्याची गरज वाटत नाही. इतरांना ईडी लावायची की नाही ते सोडून द्या. पण रामदास कदमांनी बोलताना डोळ्याला झेंडूबाम नक्की लावावा, असा टोला लगावला. तसेच, आमदारांनी खोके घेतल्याचं सिद्ध केलं तर मी उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन भांडी घासेन, यावरून त्या म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीला आपली पात्रता इतक्या लवकर कशी कळते, असा टोला लगावला.
हेही वाचा – ‘बाळासाहेब असताना मातोश्री मंदिर होतं, आता उदास हवेली’; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
रत्नागिरीतील राड्याबाबत प्रश्न विचारला असता. त्या म्हणाल्या, भाजपने अगदी पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार होण्या इतपतची गुंडागर्दी वाढवली असून घोसाळकरांचा मृत्यू असेल किंवा निखिल वागळे यांच्यावरचा हल्ला असेल. तिथपर्यंत गुंडागर्दी वाढवली. भाजपकडून ही भाषा शोभत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी थोडा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या.