“राऊतांच्या छाताड्यात भगवा झेंडा…” गुलाबराव पाटलांचा घणाघात

Gulabrao Patil : “जे गुवाहाटीला गेले ते निवडून येणार नाही. लाडक्या बहिणीने चमत्कार केला. आम्ही परदेशात नाही गेलो. थंडी हवा खायला. ज्यावेळी वारा आला, आपत्ती आली त्यावेळी सगळ्यात अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. तुम्ही त्यांना बदनाम करता”, असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. ते बुलढाण्यात बोलत होते.
माझ्या सी क्लास नगरपालिकेत किती पैसे द्यावेत. माझा बाप आला तरी तो बोलणर नाही. माझ्या नगरपालिकेचे मतदान २४ हजार आहे आणि ३३९ कोटी रुपये दिले. ३३९ कोटी आणि पत्र दिलं आला गल्ला. आम्हाला वाटलं आम्ही स्वप्नात आहे का? आम्ही असं तस निवडून आलो नाही, छप्पर फाड के निवडून आलो. आम्ही जळगाव जिल्ह्यातून साहेबांबरोबर पाच जण गेले होतो. पाचही जण निवडून आलो. त्या संजय राऊतच्या छाताड्यात भगवा झेंडा गाडून निवडून आलो, अशी टीका पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना क्रूरपणे मारण्यात आले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. हे व्यासपीठ शिवसेनेचे आहे. मी आपला आभार मानायला आलो आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
हेही वाचा – ‘राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही; सगळे बाहेर चालले…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधानसभेत म्हणालो होतो, आभार मानायला येईल, म्हणून आलो आहे. जनतेच्या पावसात भिजणारा भाऊ येथे आला आहे. मुख्यमंत्री होते, तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केले. आजही करणार, उद्याही करणार आणि करत आहे. राजकीय तापमान शिवसेनेने वाढविले. थंडगार हवा खायला कुठेतरी गेले. लाडके भाऊ आणि लाडकी बहीण यांनी विरोधकांना गप्प केले, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचा सिंचनाचा विषय घेतला. आघाडीच्या काळात फक्त चार प्रकल्पांना मान्यता दिली, पण युतीच्या काळात दीडशे प्रकल्पांना मान्यता दिली. जो उठाव केला तो उठाव एकनाथ शिंदे यांनी दाखविला. शिवसेना दावणीला बांधणीचे काम केले. एकही आमदार निवडून येणार नाही म्हणायचे पण 60 जागा निवडून आल्या. बाळासाहेबांची विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब जनतेने केले आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.