breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘..तोपर्यंत भारत आत्मनिर्भर होऊ शकत नाही’; नितीन गडकरींचं मोठं विधान

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे सतत चर्चेत असतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता आत्मनिर्भर भारत याबद्दल विधान केलं आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, ग्रामीण, कृषी, आदिवीसी क्षेत्रामध्ये खऱ्या समस्या आहे, त्याचं दरडोई उत्पन्न कमी आहे, त्याचा जीडीपी ग्रोथ मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा फक्त १२ टक्के आहे. त्यामुळे जोपर्यंत कृषी क्षेत्राचा जीडीपी मधअये वाटा हा २० टक्के होत नाही तोपर्यंत गाव समृद्ध होणार नाही. तोपर्यंत भारत आत्मनिर्भर भारत बनू शकत नाही.

हेही वाचा – लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची हाऊस फुल्ल गर्दी!

दिल्ली, मुंबई, चेन्नईचा कितीही विकास केला तर त्यांचा वाढता विकासदर व ग्रामीण भागाचा मागे पडलेला विकासदर त्यांचे कॉम्बिनेशन करून पुन्हा मागे जातो असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button