शरद पवारांनी दहशतवाद्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न का केला? नारायण राणेंचा सवाल
![Narayan Rane said why Sharad Pawar tried to support terrorists](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/sharad-pawar-and-sharad-pawar-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इस्त्रायल-हमास युद्धावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. दरम्यान, यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
नारणय राणे म्हणाले, शरद पवार यांनी इस्त्रायल-हमास लढ्याबाबत केलेली टीका दुर्दैवी आहे. दहशतवाद कुणा एका व्यक्ती, देशाविरोधात नाहीय. माणुसकीविरोधात आहे. ही देशाची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 आणि संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर मांडलीय. त्यांनी पॅलेस्टाइन विरोधात नाही, तर दहशतवादीविरोधात भूमिका घेतली. दहशतवादविरोधात भूमिका घेण चुकीच आहे, असं शरद पवार यांना म्हणायच आहे का? पॅलेस्टिनी आणि दहशतवादी एकच आहे, असं पवारांना म्हणायच आहे का?
हेही वाचा – ‘लोकसभा निवडणुकीत मोदी सत्तेत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाहीत’; पृथ्वीराज चव्हाण
शरद पवारांनी आतापर्यंत देशात-राज्यात बरीच मंत्रीपद भूषवली. ते संरक्षण मंत्री, कृषीमंत्री होते. चारवेळा महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद भूषवलं. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत १२ साखळी बॉम्बस्फोट झाले. २५७ लोकाचा मृत्यू झाला. १४०० लोक जखमी झाले त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. १३ वा बॉम्बस्फोट मशिदीत झाल्याची खोटी माहिती देऊन त्यांनी दहशतवाद्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला नव्हता का? तृष्टीकरणाच्या धोरणामुळे देशावर अनेक संकट आली, आता पवार तृष्टीकरण सोडून देशप्रथम भूमिका घेणार का? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री असताना, १३ वा बॉम्बस्फोट मशिदीत झाला असं सांगून, शरद पवारांनी जनतेची दिशाभूल का केली? ठराविक धर्माच्या लोकांना वाचवण्यासाठी दिशाभूल केली का? मिशिदीत जे घडलं नव्हतं, त्याचा उल्लेख का केला? मौलान जिऊद्दीन बुखारी यांची हत्या का झाली? ते कोण होते? असंही नारायण राणे म्हणाले.