CAA संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा..
![CAA Notification Released, Announcement by Modi Govt](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Narendra-Modi-1-780x470.jpg)
नवी दिल्ली | केंद्र सरकारने CAA (नागरिकत्व सुधारणा विधेयक) अधिसूचना जारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. या कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधील अल्पसंख्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. धार्मिक छळामुळे या तीन देशांमधून पळ काढून भारतात आलेल्या लोकांना भारतीय नागरिकत्व दिलं जाईल.
हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि ख्रिश्चन या सहा धार्मिक अल्पसंख्यांक लोकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळव्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान ११ वर्षे राहणं आवश्यक आहे. परंतु, सीएएमुळे ही अट शिथील होऊन ६ वर्षांवर येणार आहे.
हेही वाचा – डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, सांगलीतून उमेदवारी जाहीर
CAA म्हणजे काय ?
CAA अंतर्गत ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशातून आलेल्या सहा अल्पसंख्याकांना (हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारशी) भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. यासाठी या तीनही देशांतून येणाऱ्या विस्थापितांना कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट आहे.
हे उल्लेखनीय आहे की संसदेने डिसेंबर २०१९ मध्ये संबंधित विधेयकाला मंजुरी दिली होती आणि नंतर राष्ट्रपतींकडून संमती मिळाल्यानंतर, त्याविरोधात देशाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. CAA बाबत देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक राजकीय पक्षांनीही याला विरोध केला. मात्र त्यावेळी केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र कोरोना महामारीमुळे त्याला विलंब झाला आहे.