औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये दानवे-बुमरेंमध्ये जोरदार बाचाबाची!
![Aurangabad District Planning Committee meeting, there was a heated argument between ambadas danve and sandipan bhumre](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/ambadas-danve-and-sandipan-bhumre-780x470.jpg)
औरंगाबाद : छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे संदीपान भुमरेंमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी देण्याच्या कारणावरुन हा वाद झाला असल्याचं समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. यानंतर औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. यानंतर अंबादास दानवे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी खर्ची बाजूला सारत बाचाबाचीला सुरूवात केली. ते संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेले.
हेही वाचा – ‘विवेकानंदांच्या विचारातून युवाशक्तीचा विकास शक्य’; डॉ अभय जेरे
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये जोरदार राडा#chhatrapatisambhajinagar #sandipanbhumre #ambadasdanve #MaharashtraPolitics pic.twitter.com/HJUio8rZwX
— Deshdoot (@deshdoot) August 7, 2023
यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, प्रत्येकाला वाटतं की, आम्ही सत्तेत नसतानाही आम्हाला जास्त निधी मिळाला पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे. पण जो सत्तेत असतो, त्या आमदाराला निश्चित जास्त निधी मिळतो, हा अलिखित नियम आहे. पूर्वी तुम्हाला जो निधी दिला जात होता, त्यामध्ये कुठेही कमी केली नाही. तरीही तुम्हाला आणखी वाढीव निधी कशाला पाहिजे? त्यामुळे पालकमंत्री आणि इतर सहकारी संबंधित आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे तुम्ही आक्रमक व्हाल आणि अंगावर जालं, तर असे प्रकार कुणीच सहन करणार नाही.