ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अजित पवारांचे मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य

आम्ही तिन्ही पक्षाचे नेते बसू आणि निर्णय घेऊ

कराड : आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 111 स्मृतिदिन आहे. या दिवसानिमित्त अजित पवार सध्या कराडमध्ये आहेत. कराडमधील प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी तुमचंही नाव चर्चेत आहे, याबाबत काही निर्णय झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते आम्ही तिन्ही पक्षाचे नेते बसू आणि निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माझी नेता म्हणून निवड झालेली आहे. सर्व अधिकार मला दिले. एकनाथ शिंदे यांची काल नेता म्हणून निवड केली आहे. आता भाजपने नेते निवड कुणाची करायची काय नाही ते ठरवेलं असेल. आम्ही तिघंही नंतर एकत्र बसू. आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू. राज्याला मजबूत, स्थिर सरकार देऊ, असं अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button