breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
फडणवीसांचे सरकार गेले आणि फसवणाऱ्यांचे सरकार आले- मुनगंटीवार
मुंबई: सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली आहे. महाविकास आघाडी सरकारने 365 दिवसांत जनतेच्या अपेक्षांचा मोठा भंग केलेला आहे. त्यामुळेच या सरकारचा खरा चेहरा जनतेला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं सरकार आलं आहे. त्यामुळे राज्यात वर्षभरातच जंगलराज निर्माण झालेलं आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे.