TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

पालघरमध्ये दोनदा भूकंपाचे धक्के, जाणून घ्या राज्यात कधी आला विनाशकारी भूकंप

मुंबई : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी उशिरा दोनदा भूकंपाचे धक्के बसले. 18 मिनिटांच्या अंतराने झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली आहे. भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. याआधी जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात ३.६ रिश्टर स्केलचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, महाराष्ट्रातील पालघरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ५:१५ वाजता पहिला भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी मोजली गेली. बरोबर 18 मिनिटांनी म्हणजे 5:28 वाजता दुसरा हादरा जाणवला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.3 मोजली गेली.

जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू आठ किलोमीटर खोलीवर होता. भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के
८ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात ३.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ट्विट केले होते की पहाटे ४.३० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आणि भूकंपाचे केंद्र जमिनीपासून पाच किलोमीटर खोलीवर होते.

लातूरमध्ये भीषण भूकंप झाला
लातूर जिल्ह्यातील किल्लारीपासून हिंगोली सुमारे 250 किमी आहे. 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरला आलेल्या विनाशकारी भूकंपात सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button