breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई व ठाण्यात ऑरेंज अलर्ट; रायगडमध्ये रेड अलर्ट
मुंबई |
चक्रीवादळामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस सुरू असून, मुंबई वेध शाळेच्या संचालिका शुभांगी भुते यांनी पुढील २४ तासांतील हवामान विषयक माहिती दिली आहे. मुंबईत २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर रायगडमध्ये रेड अलर्ट आहे. आज संध्याकाळपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असून, मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये ताशी ९० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. उद्या वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी असा राहिल, तर हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.