अजित पवारांच्या टिकेला नितेश राणेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे
काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाहीत
पुणे : भाजप आमदार नितेश राणे यांनी काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असे घोषीत करतो, असं वक्तव्य केलं. नितेश राणेंच्या या टीकेवर अजित पवारांनी मी टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही, त्याची उंची किती तो बोलतो किती?, असा टोला लगावला आहे. या पारश्वभूमीवर आमदार नितेश राणेंनी अजित पवारांवर टिका केली आहे.
लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना औरंग्यावरची टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही, असा टोला आमदार नितेश राणेंनी अजित पवार यांना लगावला आहे.
आपण औरंगजेबाबाबत औरंजगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असता ना? असं केलेलं वक्तव्य स्वाभाविकच आहे. कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे! कारण त्यांनी तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केलं नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही, अशी टिका नितेश राणेंनी केली होती.
नितेश राणेंनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, टिल्ल्या लोकांनी सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ? त्यांना उत्तर आमचे इतर प्रवक्ते देतील, असं अजित पवार म्हणाले होते.