Breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

“पाकिस्तानकडून नागरिकांचा ढाल म्हणून वापर”; पत्रकार परिषदेत मोठा खुलासा

India-Pakistan :  भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तान चुकीची माहिती पसरवत आहे. त्यांनी भारतीय एस-४०० प्रणाली नष्ट करण्याचे, सुरत आणि सिरसा येथील विमानतळ उद्ध्वस्त करण्याचे खोटे दावे केले आहेत.

पाकिस्तानने पसरवलेल्या या खोट्या दाव्यांचे भारत स्पष्टपणे खंडन करतो. विक्रम मिस्री पुढे म्हणाले की, पाकिस्तानी सरकारी संस्था त्यांच्या सैन्याने केलेल्या कारवायांबद्दल सतत खोटे दावे करत आहेत. देशातील विविध लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्याचे त्यांचे दावे पूर्णपणे खोटे आहेत.

गेल्या दोन-तीन ब्रीफिंगमध्ये आम्ही सांगितले आहे की पाकिस्तानकडून चिथावणीखोर कारवाया केल्या जात आहेत. या दरम्यान, भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या २-३ दिवसांत पाकिस्तानी कारवाया प्रक्षोभक मानल्या गेल्या आहेत, त्याला उत्तर म्हणून भारत पूर्ण जबाबदारीने प्रत्युत्तर देत आहे.

हेही वाचा –  नो कॅश, नो पेट्रोल ! आजपासून पेट्रोल पंपावर UPI आणि कार्ड पेमेंट बंद; नेमकं कारण काय?

भारताने स्पष्ट केले की सर्व लष्करी कारवाई केवळ दहशतवादी तळ आणि लष्करी मालमत्तांवर करण्यात आली आहे, तर पाकिस्तान नागरिकांना ढाल म्हणून वापरून धोक्यात आणत आहे. भारताने ही संपूर्ण कारवाई संयम, अचूकता आणि नैतिक लष्करी तत्त्वांनुसार केली आहे. दुसरीकडे, पाकिस्तान लष्करी तळांवर हल्ले करत आहे आणि नागरिकांना लक्ष्य करत आहे.

पाकचे ६ हवाईतळ उद्‌ध्वस्त

भारताने पाकिस्तानच्या ६ एअरबेसवर हल्ला केल्याच्या बातम्यांना पुष्टी मिळाली आहे. ज्यामध्ये रफीकी, मुरीद, चकलाला, रहिमयार खान, सुक्कुरआणि चुनिया एअरबेस यांचा समावेश आहे. याचे व्हिडिओही उपलब्ध झाले आहेत. यात तारीख आणि वेळेसह सर्व दावे सप्रमाण स्पष्ट होत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button