महाराष्ट्रातील ५० मान्यवरांचा ‘महाराष्ट्राची गिरीशिखरे’ पुरस्काराने होणार सन्मान
![50 dignitaries from Maharashtra will be honored with 'Maharashtrachi Girishikhare' award](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/bhagat-singh-1.jpg)
मुंबई – राष्ट्रपिता महात्मा गांधी एकदा म्हणाले होते की, ‘महाराष्ट्र हे उदात्त कार्यांसाठी समर्पित असून कार्यकर्ते मधमाशांच्या पोळ्यासारखे आहेत.’ अशाच महाराष्ट्रातील सर्जनशील व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी मुंबईत महाराष्ट्राची गिरीशिखरे पुरस्कार सोहळा २६ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.
१ मे १९६० रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठी भाषिक लोकांचे एक भाषिक राज्य अशी महाराष्ट्राची निर्मिती होईपर्यंत महाराष्ट्राचा जवळपास दीड दशकाचा बहुमुखी इतिहास आहे. मुंबईतील महत्त्वाच्या खुणांपैकी एक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
या कार्यक्रमात शास्त्रीय व लोककलाकारांचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात अमोल पालेकर, सुनील गावस्कर, रोहिणी हट्टंगडी, भीमराव पांचाळे, सुरेश वाडकर, उषा मंगेशकर, अनिता डोंगरे, आशा खाडिलकर आणि तेजस्वनी सावंत यांसारख्या दिग्गजांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा सोहळा नेत्रदीपक अशा मराठी सांस्कृतिक मेजवानीसह पुढे जाईल यांत शंकाच नाही. या कार्यक्रमाचे आयोजन २६ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत रंगशारदा नाट्यमंदिर, लीलावती हॉस्पिटलजवळ, वांद्रे (प.) येथे करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते या कार्यक्रमात देण्यात येणारा आणि अवॉर्ड गॅलरीने खास डिझाईन केलेल्या अवॉर्डने सन्मानित करण्यात येईल. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.
या शुभप्रसंगी विविध क्षेत्रातील पन्नास नामवंतांना ‘महाराष्ट्राची गिरिशिखरम’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पन्नास व्यक्तिमत्त्वांपैकी वीसहून अधिक व्यक्तींना भारत सरकारने नागरी पुरस्काराने सन्मानित केले.